राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. यावेळी जनतेतून सरपंच निवड नसल्यामुळे अनेकठिकाणी सरपंचपदासाठी घोडेबाजार झाल्याचे पाहायला मिळाले. यातून अनेक ठिकाणी वाद झाले. पुणे जिल्ह्यातील मोहकल येथे पराभूत उमेदवाराने नवनिर्वाचित सरपंच महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे.सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबाला घरात घुसुन बेदम मारहाण झाली. खेड तालुक्यातील मोहकल गावातील ही घटना आहे. आश्विनी मारुती भागवत असे मारहाण झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राज्यात जवळपास १२ हजार ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवरील दोन गट समोरासमोर भिडतात आणि यातून या निवडणुका अतिशय चुरशीच्या होताना दिसून येतात.ज्या गावामध्ये विकासाच्या मुद्यावर एकमत होते तेथे निवडणुका बिनविरोध पार पडत असल्याचेही दिसून आले.अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी-तिरंगी लढती झाल्या,या मध्ये आरोप प्रत्यारोपाचा गदारोळही पाहावयास मिळाला पण बहुतांश ठिकाणी निडणुकीपुरते राजकारण हीच भूमिका घेतली गेल्याने हि सारी प्रक्रिया शांततेत पार पडली.पण याच वेळी काही ग्रामपंचायत निवडणुकीत मुद्याचा विरोध का गुद्यावर आला असल्याचे दिसून आले.मात्र थेट नूतन महीला सरपंचास व तिच्या कुटूंबास मारहाण करण्याची हि पहिलीच घटना ठरली आहे.