पंढरपूर दि.20 ः महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत येथील सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांना घरपट्टी मालमत्ता कर 100 टक्के माफी देण्याचा शासन निर्णय झालेला आहे.
आमदार श्री भारत भालके यांनी कायमच देशातील, राज्यातील सैनिकांचा आदर केलेला असून त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींचाही तितकाच आदर करीत असतात. तसेच त्यांच्या वक्तव्यातून कायमच सैनिकांचा सन्मान केल्याचे दिसून येते. आपले सैनिक डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस सीमेवर रक्षण करीत असल्यामुळे आपण सुखाने राहु शकतो. आमदार श्री भालके यांनी यापूर्वी अनेकदा सदर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये प्रयत्न केलेला आहे. परंतु विरोधी पक्षाचे सरकार असल्यामुळे याबाबत न्याय मिळालेला नव्हता, आता या आघाडी सरकारने या प्रश्नी न्याय देऊन कृतज्ञता व्यक्त करून तसा जी.आर.काढल्यामुळे आमदार श्री भारत भालके यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले आहेत.