प्रतिनिधी- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना लाभ होतो. मागील दोन पाण्याची आवर्तने झाली परंतु मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्राच्या शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली तसेच मी स्वतः फोनद्वारे, पत्राद्वारे बऱ्याच वेळा पाणी देण्याबाबत मागणी केलेली असताना सुद्धा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळालेले नाही. आता पावसाळा सुरू असून वरच्या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून कृष्णा व पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत असून त्या नद्यांना पूर आलेला आहे परंतु मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये अलीकडे अत्यल्प पाऊस पडल्याने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीतून वाहत जाणारे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे या भागात दिले तर या भागातील बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव भरून घेता येतील आणि या भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच दक्षिण भागातील शेतकऱ्यांची पाणी मागणी असल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे टेल टू हेड नियमाप्रमाणे मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना हे पाणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तसेच विशेषतः लवंगी, पडोळकरवाडी, शिरनांदगी व मारोळी येथील साठवण तलाव प्राधान्याने भरून द्यावेत अशीही मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. आमदार आवताडे या मागणीची दखल घेऊन सोमवारी पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले साहेब यांनी या विषयावर बैठक घेऊन अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना या योजनेतून येणाऱ्या पाण्यातून भागातील बंधारे, पाझर तलाव व साठवण तलाव भरून घेण्याचे निर्देशीत केले आहे. या योजनेद्वारे येणाऱ्या पाण्याचा येथील शेतकरी व नागरिकांनी आपापसात कोणत्याही प्रकारचे वाद न करता योग्य आणि आवश्यक पद्धतीने आपल्या भागातील सर्व बंधारे, साठवण व पाझर तलाव भरून घेण्याचे व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी त्याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Related Articles
कार्तिकी वारीत पंढरीत १ लाख २५ हजार भाविकांना मोफत आरोग्य सुविधा
आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली माहिती कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरात आलेल्या वारकरी भाविकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच ६५ एकर येथील महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासण्या व उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य विभागाकडून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी तसेच महाआरोग्य शिबिरच्या माधमातून १ लाख २५ […]
टपली मारल्याच्या रागातून पैलवानाचा खून
पुणे -येता जाता टपल्या मारल्याच्या रागातून पैलवानाचा कुऱ्हाड आणि तलवारीने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील अल्पवयीन चौघांसह सात जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासांत ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ घडली. सचिन तानाजी वाघमारे (22), सोमनाथ दत्तात्रय गाडे (25, दोघे रा.आंबेगाव पठार), तुषार जालिंदर सरोदे (25, रा. कात्रज) अशी अटक आरोपींची […]
सरपंचाला 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती […]