ताज्याघडामोडी

हसतं खेळतं कुटुंब पहाटेच्या भांडणामुळं संपलं, आईला पाहून लेकरांना धक्का, वडिलांना शोधलं अन्…

घरचे सर्वजण झोपेत असताना भल्या पहाटे पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वाद एवढा विकोपाला गेला की चक्क पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घातला. यामुळे वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. हे पाहून पतीने पळ काढला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान पत्नीचा नागपूर येथे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी गावात घडली आहे. मृतक पत्नीचे नाव भारती भारत चाचेरे (४०) असून पतीचे नाव भारत चाचेरे (४४) असे आहे. त्यानंतर आरोपी पतीने सुद्धा सेलोटी गावाजवळील नहरात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक भारती आणि भारत या दोघा पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद सुरूच असायचा. मात्र मंगळवारला पहाटेच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. या वादात मृतक भारती ही स्वयंपाक घरात गेली. तिच्या पाठोपाठ जात पतीने घरात पडलेला लाकडी पाटाचा जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर केला. यामुळे ती गंभीरित्या जखमी होऊन रक्ताच्या चारोळ्या बेशुद्ध अवस्थेत पडली.

यानंतर भारतने तेथून पळ काढला. दरम्यान मुले झोपेतून उठली तेव्हा त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत स्वयंपाक घरात पडलेली दिसली. मुलांनी आरडाओरड सुरू केली. लगेच घराजवळील मंडळी आली आणि मृतक भारतीला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या हत्येची तक्रार १६ वर्षीय मुलगी खुशी हिने लाखनी पोलिसांनी दिली. लाखनी पोलिसांनी मृतक भारत हा फरार असल्याने त्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतने गावाजवळील एका नहारात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *