अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रतिक साळुंखे हे गेली अनेक वर्षे मराठा समाजाचे काम करीत आहेत. मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात नेहमीच अग्रणी असतात. त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ पाहून व त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य पाहूनच अशा अभ्यासू युवा नेतृत्वाची निवड करण्यात आली असे मराठा महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. मराठा महासंघाचे कार्य जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय व हितासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिक साळुंखे यांनी सांगितले. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महासंघाचे जिल्हाअध्यक्ष शशिकांत पाटील, युवक जिल्हाअध्यक्ष अवधूत पाटील तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
Related Articles
तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून अनेक संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जातायत. एवढेच नाही तर नियम मोडल्यामुळे जाब विचारल्यानंतर अनेकजण पोलिसांशी हुज्जतसुद्धा घालत आहेत. त्याची प्रचिती औरंगाबादेत आली आहे. मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन तरुण आणि […]
सहायक पोलीस आयुक्तांनी मित्राच्या पत्नीची काढली छेड, तक्रारीनंतर गुन्हा दाखल
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आले होते. त्यामुळे दोघांची भेट झाली. मात्र याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का, अशी विनंती विशाल ढुमे यांनी आपल्या मित्राला केली. त्यामुळे मित्रानेदेखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले. त्यानंतर […]
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वरुणराजाचं पुनरागन झालं आहे. मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत […]