जुलै महिना पावसाचा असणार आहे. राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट दिले आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
कोकणातील अन् विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच खान्देश, मध्य महाराष्ट्रासह १० जिल्ह्यांत आणि मराठवाड्यामधील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. राज्यात आता २७ जुलैपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना ?
- १८ जुलै : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
- १९ आणि २० जुलै : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
- २१ जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली