गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय

लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाची आठवण झाली

मनतू पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचकिला गावातील रहिवासी सनोज कुमार सिंग याचा विवाह 10 मे रोजी प्रियंका कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर प्रियंका खुश नसल्याचं सनोजला जाणवू लागलं. आपल्याच गावात राहणाऱ्या जितेंद्र नामक तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, असं समोजला समजलं.

सध्या आसपासच्या घटना पाहता, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागल्यास, पती स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करुन घेत असल्याचे पाहायला मिळते, किंवा पत्नी अथवा तिच्या प्रियकराचे प्राण घेत असल्याची उदाहरणं वाचायला मिळतात. मात्र सनोजने कुणाच्याही जीवाशी किंवा आयुष्याशी खेळ न करण्याचा निर्णय घेतला.प्रियंका आणि जितेंद्र गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वेगळ्या जातीचा असल्याच्या कारणावरुन दोघांच्या लग्नाना कुटुंबीयांनी विरोध केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *