वातावरणात गेल्या महिन्यांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाच्या झळा बसत होत्या तर मार्च महिन्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यातच तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांनी बसणार आहे. महाराष्ट्र पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ४ ते ८ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण मध्य प्रदेश व गुजरात आणि उत्तर कोकण या भागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.