ताज्याघडामोडी

भजी खाताना क्षुल्लक कारणावरुन वाद, मग त्याने ऑम्लेटच्या दुकानातून चाकू उचलला अन् मित्राचा अंत

दोन मित्र हॉटेलमध्ये भजी खात असताना किरकोळ करणावरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच धारदार चाकूने मित्रावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान मित्राचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद – पैठण मार्गांवरील साखर कारखाना परिसरात घडली आहे.

अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख (वय-३५ रा. पिराची पिंपळवाडी, पैठण) असे मृताचे नाव आहे. तर रामेर उर्फ राम गजेसिंग बोते (वय-३७ रा.साखर कारखाना कॉलनी पैठण) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी अब्दुल आणि राम अडीच वाजेच्या सुमारास कारखाना परिसरातील एका हॉटेलमध्ये भजी खाण्यासाठी गेले होते. तेथे गप्पा मारत दोघेही भजी खात होते. दरम्यान किरकोळ विषयाला घेऊन दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर बाचाबाची झाली.

वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या रामने बाजूच्या अंडा ऑम्लेटच्या दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकूने अब्दुलवर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर अब्दुल जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अब्दुलली तसंच टाकून आरोपी रामने तेथून पळ काढला. तेथे उपस्थितांनी जखमी अब्दुलला तातडीने रुग्णाल्यात हलवले. मात्र, उपचार सुरु असताना अब्दुलचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *