ताज्याघडामोडी

दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या तीन भावांना ट्रकने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दुचाकीला जोरदार टक्कर दिली. या अपघातामध्ये तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

खटखरी पोलीस स्थानकाचे सब-इन्स्फेक्टर प्रज्ञा पटेल यांनी सांगितले की, तिघे भाऊ दहावीची अंतिम परीक्षा देऊ घरी परतत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकच्या टायरखाली आल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ताज अंसारी, रानू अंसारी आणि इश्मा अंसारी अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे.

महाराष्ट्रात ट्रकने दोघांना चिरडले

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात महामार्गावर एका वेगवान ट्रकने दोन लहान मुलांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मोखाडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. आरोही सोनार आणि पायल वारखडे अशी मृतांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *