एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनीही आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. तिघांनीही दोन दिवसांपूर्वी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
औषध प्राशन केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला.