ताज्याघडामोडी

राज्यासाठी २४ तास महत्त्वाचे, मुंबई, ठाण्यासह २९ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यात इतरत्र पाऊस होणार असून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर एका जिल्ह्यात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *