राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले संकेत
शिंदे सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले असून मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस सज्ज असून आमची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.
‘भारतात लोकशाही टिकवण्यासाठी पंक्षांतर बंदीचा कायदा झालेला आहे त्याच योग्य अमल झाला तर…कुणी कुठून ही निवडून या आम्ही त्यांना गोळा करू म्हणणाऱ्यांना आळा बसण्यासाठी सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय दिला पाहिजे, अशी अपेक्षाही जयंत पाटलांनी व्यक्त केली.