देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष होत आली तरी देखील देशात जातीय अत्याचाराच्या काही केल्या कमी होत नाहीत. या धर्तीवर मध्यप्रदेशातील बावलियाखेडी गावात एका १६ वर्षीय दलित मुलीला शाळेत पाठवल्याने गावातील उच्चवर्णीयांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील बावलियाखेडी गावात शाळेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीला गावातील उच्चवर्णीय कुटुंबातील काही लोकांनी अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीच्या भावाने मध्यस्थी केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. या नंतर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी नातेवाईकांसह मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही मारहाण केली. कुंदन राजपूत, धर्मेंद्र सिंग, साजन सिंग, मान सिंग, माखन सिंग, ईश्वर सिंग आणि तुफान सिंग राजपूत अशी मारहाण केलेल्या आरोपींची नावं आहेत.
शाजापूरमधील कोतवाली पोलिसांनी SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली वर नमूद केलेल्यांसह सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपींनी, याउलट, गुन्हेगारी कृत्य सुरू करण्याचा त्यांचा स्वतःचा हेतू मान्य न करता, मुलीच्या कुटुंबाविरुद्ध ‘हल्ला’ केल्याबद्दल क्रॉस एफआयआर दाखल केला आहे.