Uncategorized

सर्वकाही सुरू मग शाळाच का बंद ? तातडीने शाळा सुरु करा 

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत शाळा बंद ठेवण्याचे फर्मान काढले.वास्तविक पाहता शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय घाईगडबडीत व राज्याच्या ठराविक भागातील परिस्थिती लक्षात घेत संपूर्ण राज्यावर लादला आहे.एकीकडे हॉटेल,परमिटरूम,विविध मॉल,मंदिरे आदी गर्दीचे ठिकाणी सुरु असताना केवळ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद असो अथवा नगर पालिका शाळा या ठिकाणी शिकणारे बहुतांश गोरगरीब विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित रहात असून ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसलेले आहेत.तरी तातडीने हा निर्णय मागे घेत शाळा पूर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने शासनाकडे तहसीलदार पंढरपूर यांच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली आहे.  

    यावेळी वंचित बहुजन आघडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तोरणे,ताःअध्यक्षःविकास गायकवाड शहराचे राजाभाऊ शिंदे,रवी सर्वगोड ताःउपाध्यक्ष गणेश बाबर कपिल बनसोडे लिंगेश्वर सरवदे ताःसचिवःअमोल चंदनशिवे *ताःसंघटक सुनिल दंदाडे कट्टर समर्थक आदःबाळासाहेब आंबेडकर दीपक सोनवले शहराचेःनवनाथ {पिंटू} मोरे सतीश सातपुते रवी {लालबहाद्दूर }वाळके बंटी परचंडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *