ताज्याघडामोडी

राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना बसणार फटका

राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे.

त्यातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.

30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने मच्छिमारांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी समुद्रात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरवर पोहोचण्याची शक्यता असल्याने एक आणि दोन तारखेला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या तर दोन आणि तीन तारखेला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *