कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण व भारतीय संविधान दिन साजरा
२६ नोव्हेंबर २०२० रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला केला होता यामध्ये भारताचे वीर जवान शहीद झाले होते या जवांनांनी आपल्या प्राणांची आहुती देवून देशाचे संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावले अशा या महान वीर भारतीय जवानांना कर्मयोगी प्रशाले कडून श्रद्धांजली वाहून त्यांची शौर्यगाथा उजागर केली व सर्वांनी त्यांना मानवंदना दिली.
२६/११/ १९४९ रोजी भारताचे संविधान अंगिकृत आणि अधिनियमीत करुन स्विकारण्यात आले तेव्हापांसून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून कर्मयोगी प्रशालेमध्ये भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले
याप्रसंगी संस्थेचे प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके शिक्षक अरविंद चौगुले राहुल काळे श्रीमती कोकणे सौ प्रियांका माने श्री नारायण कुलकर्णी श्री राजेंद्र जाधव सौ सारिका बनसोडे श्री राजेंद्र सावंत व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते