ताज्याघडामोडी

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती कालच तुटली

आमदार बच्चू कडू यांचा दावा

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भाष्य केलं ते तुम्ही पाहिलं असेल. त्यांनी मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. त्यामुळे दोघांची युती तुटल्याचं स्पष्ट आहे, असा दावा बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड काम करत आहेत. रात्री दोन वाजता गेलो तरी मुख्यमंत्री भेटतात. मुख्यमंत्री हिराच आहे. हिरा कही भी चमकता है, असंही ते म्हणाले.सरकार पडण्याचे अजितदादांना स्वप्न पडत राहतात. ते सकाळचे स्वप्न नाही. ते रात्री 12च्या आतचे स्वप्न पाहतात. त्यामुळे त्यांना वाटतं सरकार पडेल, असा चिमटा त्यांनी काढला.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *