एक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथे विजेच्या तारेला चिटकून आईसह दोन लेकरांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली. राठोड वस्तीतील शेत शिवारात दोन लहान मुले शेतात खेळत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागला. त्यात दोन मुले खाली पडली.त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या आईला देखील शॉक लागल्याने या घटनेत तिघाचा दुदैर्वी मृत्यू झाला.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे तिघांचा बळी गेल्याने संता व्यक्त केला जात आहे. मृतांमध्ये आई आणि दोन मुलांचा समावेश ललीता श्रीकांत राठोड (वय वर्ष 30), अभिजीत श्रीकांत राठोड (वय वर्ष 8), प्रशांत श्रीकांत राठोड (वय वर्ष 11) असे विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या आई व दोन मुलांची नांवे आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात एकाच घरातील तिघेजण मृत्यू पावल्यामुळे भेंडटाकळी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.