ताज्याघडामोडी

तीन महिन्यापूर्वी लग्न, घरात कुणी नसताना टोकाचा निर्णय

जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन अमरसिंग पवार (वय ३० रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असं मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन पवार हा तरूण जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी २ वाजता घरातील सर्वजण कामाला निघून गेले होते. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे पवन हा घरात एकटाच होता. त्याने राहत्या घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेऊ-न आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

दरम्यान, त्याची आई घरात परत आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती पवनला मयत घोषीत केलं.

पवन पवार याचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. त्याच्या पश्चात घरात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि वहिनी असा परिवार होता.घरात सर्व एकत्र कुटुंब आणि सर्व काही सुरळीत असताना पवनने अचानक टोकाचा निर्णय का घेतला? हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *