विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती. मात्र राज्यात पक्षांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांकडे नेत्यांचा कल वाढला होता. मात्र माथाडी कामगारांचे नेते आणि शिवसेनेकडून लोकसभा लढविणारे नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. तसेच भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत.
माथाडी कामगारांच्या प्रश्नांनावर वेळोवेळी मागणी करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिला नाही. कामगारांच्या प्रश्नी आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे, असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी शिवसेना सोडण्याची घोषणा केली होती.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते. पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान आपण माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता आहे. पुढील काळात काय करायचे हा माझा वैयक्तीक निर्णय असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ते माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीदिनी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…