महाराष्ट्र पोलीस हा राज्यातील कायदा व न्यायप्रेमी लोकांसाठी सदैव अभिमानाची बाब ठरली आहे पण काही हप्तेबाज,नशेबाज,वसुली बहाद्दर आणि दोन नंबर व्यवसायिकाचे पाठराखण करून महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारेही काही महाभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे आणि अशा महाभागांच्या मुसक्या आवळ ण्याचे काम देखील कर्तव्यदक्ष पोलीस करीत असल्याचे दिसून आले आहे.
उस्मानाबाद येथील एका ३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या महिलेच्या आत्महत्येस एक पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने दाखल केली आहे.सदर महिलेने हरिभाऊ कोळेकर या पोलिसाने माझ्या घरी येऊन बलात्कार केला आणि तो नेहमी मला धमकावत होता व वारंवार बलात्कार करत होता अशी व्यथा मांडली आहे.या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून दोनच दिवसापूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा गुन्हा घडला होता.त्यामुळे पोलीस खात्यातील अशा नीतिमत्ताशून्य व पदाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…