माघी वारी असल्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर व इतर दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्याअनुषंगाने पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी जवळपास ३००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संचारबंदी मुळे कोणतेही हॉटेल उघडणार नाहीत. यातून पोलिस बांधवांची गैरसोय होऊ शकते म्हणूनच त्यांच्यासाठी डीव्हिपी उद्योग समूहाचे संचालक श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून सकाळचा नाश्ता/फराळ, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण आपल्या तर्फे देण्यात येत आले. त्यामध्ये केळी, पाणी बॉटल खिचडी यांचाही समावेश होता.
कोणताही सण, उत्सव असो आपला परिवार, आपला आनंद-उत्सव बाजूला ठेवून २४/७ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बांधव अव्याहत तत्पर असतात. समाजासाठी त्यांचे कार्य अत्यंत अमुल्य असल्याने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे श्री.अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले.
त्यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.पवार साहेब, सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री.जाधव साहेब, श्री.गरड साहेब, श्री.आर्किले साहेब, डिव्हीपी उद्योग समूहाचे श्री.अभिजीत कदम, श्री.परवेज मुजावर, श्री.शरद घाडगे, श्री.शरद चव्हाण तसेच इतर पोलीस बांधव होते.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…