पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉक्टरच्या अपहरणाच्या घटनेची उकल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी खंडणीसाठी अपहरण करायची. रेकी करून अपहरण केल्यानंतर खंडणी वसुली करणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये राहणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरचे ६ फेब्रुवारी रोजी वांद्र्याच्या कार्टर रोडवरून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांच्याकडे ९ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. डॉक्टरने इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. त्यावेळी कमी पैसे स्वीकारण्याची तयारी या टोळीच्या सदस्यांनी दाखवली.
आरोपींनी ६ लाख ४० हजार रुपये घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरला सोडले.गुन्हेगारांच्या तावडीतून सुटल्यानंतर डॉक्टरने तात्काळ पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिसांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना आरोपींच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दहिसरमधून आरोपींना अटक केली.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…