विठ्ठल कारखान्याच्या यार्डजवळील आत्महत्या मुकादमाच्या जाचामुळे

कर्नाटकात झालेल्या मारहाणीनंतर मयत होता प्रचंड तणावात

सुभाष शिवाजी जाधव रा.रा.येवता ता. केज जि.बीड हा ऊसतोड कामगार कादम बालू चिंचकर यांच्या टोळी मध्ये काम करीत होता व शिवशक्ती साखर कारखाना बागेवाडी ,कर्नाटक येथे उस तोडीकरता गेलेला होता.त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर मुकादम बालू चिंचकर व त्याचा भाऊ गोविंद चिंचकर यांनी सुभाष याला हात पाय बांधून गंभिररीत्या मारहाण केली होती असे मयत सुभाष याने भाऊ व सदर प्रकरणातील फिर्यादी संतोष शिवाजी जाधव वय 27 वर्षे जात मातंग व्यवसाय -उसतोड कामगार रा.येवता ता. केज जि.बीड यास सांगितले होते.या घटनेनंतर मयत सांदीप जाधव हा प्रचंड तणावाखाली होता.या तणावातूनच त्याने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे येथे यार्ड जवळ अज्ञात वाहनाखाली उडी मारून आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद संतोष शिवाजी जाधव वय 27 वर्षे जात मातंग व्यवसाय -उसतोड कामगार रा.येवता ता. केज जि.बीड सध्या 45 गाव फाटा टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
        या बाबत दाखल फिर्यादीनुसार फिर्यादीचा मोठा भाऊ सुभाष हा मुकादम बालू चिंचकर याचे बरोबर कर्नाटक येथे सहकारी साखर कारखान्यावर उस तोडीकरता गेलेला होता. त्याठिकाणी सुभाष याचे बालू चिंचकर याचेबरोबर वाद झालेबाबत एक महिन्यापूर्वी सुभाषणे फिर्यादीस कळविले होते. त्यावेळी बालू चिंचकर व त्याचा भाऊ गोविंद चिंचकर यांनी सुभाष याला हात पाय बांधून गंभिररीत्या मारहाण केली होती असे त्याने सांगितले होते. म्हणून फिर्यादी व काम करत असलेल्या टोळीतील काम करणारा ड्रायव्हर काटे याचेसह कर्नाटक येथे भाऊ सुभाष काम करत असलेल्या कारखान्यावर जावून आले परंतू त्याठिकाणी भाऊ तसेच बालू चिंचकर तेथे भेटले नाहित.त्यानंतर घरी आल्यानंतर टोळीतील एका व्यक्तीला फोन करून बालू चिंचकर याचेशी बोल्लो त्यावेळी माझ्यात व त्याच्या वादविवाद झाला. या वादविवादा नंतर सुभाष हा त्याला घाबरून तेथून निघून म्हमंदापूर येथिल मठामध्ये राहण्यास गेला. त्याठिकाणी बालू चिंचकर याने जावून पून्हा त्यास दमदाटी केली होती.त्यामुळे भाऊ सुभाष हा बालू चिंचकर हा आपले काहीतरी बरी वाईट करील या भितीने त्या तणावा खाली राहत होता.काल दि. 22/01/2021 रोजी सकाळी 08.00 वा. चे सुमारास फिर्यादीस मोबाईल नंबर 8390397158. वर कोणीतरी फोन करून सांगितले कि , तुझा भाऊ विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या यार्डाजवळ गुरसाळे येथे मयत झाला आहे. यावरून भाऊ सुभाष शिवाजी जाधव वय. 35 वर्ष याने बालू चिंचकर याचे भितीपोटी कोणत्यातरी अज्ञात वाहनाखाली उडी मारल्याने व त्याच्या अंगावरून वाहनाचे चाक गेलेने तो मयत झाला आहे. त्यास सदरचे कृत्य करण्यास बालू चिंचकर व गोविंद चिंचकर यांनीच प्रवृत्त केले अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

22 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago