देवाचा नवस फेडण्यासाठीचे बोकड चोरटयांनी पळवले

बोकड आणले परत,गुन्हा दाखल

          पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील शेतकरी बाजीराव मधुकर पाटील हे शेतीबरोबरच शेळीपालनाचा जोडव्यवसाय करतात.२८ डिसेंबरच्या मध्यरात्री बाजीराव पाटील हे झोपले असता त्यांना रात्री १ वाजनेच्या सुमारास चुलत भावाने गावात शेळीचोर आले आहेत असा फोन करून बाजीराव पाटील याना सावध केले असता बाजीराव पाटील यांनी शेळ्या बांधलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता देवाच्या नवसासाठीचे बोकड गायब झाल्याचे दिसून आले.
           बोकड चोरीस गेल्याचे दिसताच सदर शेतकरी बाजीराव पाटील यांनी बाळासाहेब ,मधुकर बाबा सदगर याना सोबत घेत मोटारसायकलवरून बोकडचोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या बाबत त्यांनी जागोजागी चौकशी केली असता तीन अनोळखी लोक मोटार सायकलवर काळ्या रंगाचे बोकड घेवुन गेले आहेत ते लोक अकलुजच्या दिशेने निघुन गेले आहेत असे सांगण्यात आले.म्हाळुंग ता माळशिरस गावचे हद्दीत व्हरगर वस्तीजवळ आमचे बोकड मोटार सायकल वरुन घेवुन चाललेले लोक दिसले.यावेळी झालेल्या झटापटीत चोरटे बोकड व त्यांची मोटारसायकल जागीच टाकून पळून गेले.या प्रकरणी तीन अज्ञात चोराविरोधात करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago