…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी

…तर शेतकऱ्यांसाठी देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक

केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात राजधानी दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राज्यातही पडसाद उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करत या कायद्याला विरोध केला आहे.कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर माजी खासदार आणि संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ वातावरण तापलं होतं.”शेतकर्‍यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय वळण लावून जर परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर देश पेटवून सोडल्याशिवाय राहणार नाही,” असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले.कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

यावेळी पुतळा दहन करण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांची अडवणूक करण्यात आली. मात्र आमची अडवणूक झाली असली तरी आमचा उद्देश आम्ही साध्य केलाय, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं “शेतकऱ्याला खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले”, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी अमित शहा यांच्यावर केली आहे.शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी जातीवादाचं ठेवणीतलं अस्त्र केंद्र सरकारनं बाहेर काढलं असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “लोकशाहीचे संकेत धाब्यावर बसून घाईघाईने केंद्र सरकारने कृषी विधेयकं मंजूर केली. शेतकऱ्यांची पसंती नसतानाही ही विधेयक मंजुर करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्या, उद्योजक यांच्या घशात शेती व्यवसाय घालण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. त्यामुळे शेती वाचवा आणि आम्हाला वाचवा अशी मागणी शेतकरी वर्ग करतो आहे. शेतकर्‍यांना सन्मानाने शेतीव्यवसाय करू देणं, हमीभावाचा कायदेशीर अधिकार शेतकऱ्यांना मिळायला हवा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

2 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago