ताज्याघडामोडी

लोकसभे बरोबरच विधानसभांच्या निवडणुका घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पाठींबा

देशात लोकसभा निवडणुकांच्या बरोबरच विधानसभा निवडणुकाही एकत्र घेतल्या जाव्यात आणि ‘एक देश एक निवडणूक’ प्रक्रियेला सुरुवात करावी अशा पद्धतीची चर्चा केंद्रात सुरू आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीने राजकीय पक्षांकडून अभिप्राय मागवले होते. त्यानुसार देशभरातील विविध पस्तीस राजकीय पक्षांनी यासंदर्भात आपला अभिप्राय सदर समितीला पाठवला आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोविंद समितीला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी एकत्र निवडणुका घेण्यात आल्या तर वेळेची आणि पैशाची निश्चितच बचत होईल, असे मत मांडले आहे. तसेच कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडू शकेल त्यामुळे याबाबतीत निश्चितच विचार व्हावा, असेही त्यांनी म्हटलंय.

अलिकडेच मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, येत्या सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणासह इतर काही राज्यांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यामुळे जर एकत्रित निवडणुका झाल्या तर वेळेची आणि निवडणूक प्रक्रियेत लागणाऱ्या खर्चाची निश्चितच बचत होईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रात व्यक्त केले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदीलच दाखवला आहे.

या संदर्भातील पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, एनडीए सरकारकडून केंद्रात अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवल्या जात आहेत. या सुधारणांचा एक भाग म्हणजे ‘एक देश एक निवडणूक’ आहे. देशात वारंवार निवडणुका होणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने निश्चितच चांगले लक्षण नाही, त्यामुळे केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला आपले समर्थन, असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना केंद्र सरकारच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. खरंतर एक देश एक निवडणूक पद्धतीने लोकसभेची निवडणूक संपूर्ण देशभर घेतली जाते. आपला देश हा संघ राज्य पद्धतीने चालत असल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसह सर्व निवणुका एकत्र घेण्याच्या प्रक्रियेची देशाच्या घटनेत तरतूद नाही. भारताच्या आधीच्या निवडणूकांचा इतिहास पाहिला तर अशी निवडणूक 1967 साली झाली होती. यावेळी लोकसभेसाठी काँग्रेसला बहुमत मिळाले पण अनेक राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर 71 साली लोकसभेच्या निवडणूका झाल्या आणि ही परंपराही खंडीत झाली. पुन्हा याची सुरुवात करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे, मात्र याला सर्वसंमत्ती मिळणे सध्या तरी कठीण दिसत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago