ताज्याघडामोडी

‘मी जातेय’, नवऱ्याच्या पाया पडून खोलीत गेली, त्यानंतर पत्नीने केलं धक्कादायक कृत्य

मध्य प्रदेशमध्ये पत्नीने तिचं जीवन संपवल्याचा अजब प्रकार उघड झालाय. नवऱ्याच्या पाया पडून त्याची परवानगी घेऊन पत्नी घरात गेली, ती कधीही परत न येण्यासाठी. पत्नीच्या अशा वागण्याची पतीला जरासुद्धा कल्पना नव्हती. घटनेमुळे पती व इतर नातेवाईकांना धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातल्या ररी गावात ही अजब घटना घडली. थंडीमुळे घराबाहेर ऊन खात बसलेल्या नवऱ्याजवळ पत्नी आली. त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, ‘मी जाते.’ त्यानंतर पत्नी घरात गेली. थोड्या वेळाने नवरा आत गेला, तर पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बाजूलाच रक्तानं माखलेला चाकूही पडला होता.

ररी गावात राहणाऱ्या रमेश शर्मा यांना घडलेल्या प्रकाराबद्दल जराही कल्पना नव्हती. पत्नी पाया पडून जगातून कायमस्वरूपी जाण्याची परवानगी मागतेय, याचा त्यांना अंदाज नव्हता. शनिवारी (27 जानेवारी) रमेश शर्मा घराबाहेर ऊन खात बसले होते. तेव्हा घरातून त्यांची पत्नी आशादेवी बाहेर आली. 42 वर्षांची पत्नी आशा देवी यांनी नवऱ्याला पाया पडून ‘मी आता जाते’ असं म्हटलं. यावर रमेश यांना काही विशेष वाटलं नाही. त्यानंतर आशा देवी घरात गेल्या. काही वेळानंतर रमेश हेही घरात गेले, मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

आशादेवी यांनी घरात आल्यानंतर स्वतः चाकूने गळा कापून घेऊन स्वत:ला संपवलं. नातेवाईकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली, तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आशा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा यांना टीबी झाला होता. बऱ्याच काळापासून आजारी असल्यामुळे त्यांची मानसिक स्थितीही नाजूक झाली होती. या आधीही त्यांनी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं होतं. मात्र या वेळी आशा यांनी त्यांचा जीव वाचवण्याची संधी कोणालाही दिली नाही. यावेळी हाताची नस न कापता त्यांनी गळ्यावरूनच चाकू फिरवला. आशा देवी असं काही करतील, याची त्यांच्या नातेवाईकांना कोणालाच कल्पना नव्हती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शारीरिक व्याधींमुळे बराच काळ ग्रस्त असलेल्या लोकांना मानसिक ताण व अस्वास्थ्याचा सामनाही करावा लागतो. अशा वेळी त्यांना समुपदेशनाची गरज असते. ते वेळीच मिळालं नाही, तर प्रसंगी अशा घटनाही घडू शकतात.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago