नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादादरम्यान थेट गावठी कट्ट्याने फायरिंग करण्यात आली आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलगावचा पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. सकाळी शेतात कामानिमित्त सर्व खर्डे परिवार शेतात गेले होते. या खर्डे परिवारात शेताच्या बांधावरून नेहमी छोटे मोठे वाद होत असत. नेहमीच होणाऱ्या वादामुळे आज या परिवारात हाणामारी झाली.
गणेश खर्डे यांच्याकडे आलेल्या पाहुण्याने (संशयिताचे नाव माहित नाही) मलगाव येथील २४ वर्षीय अविनाश सुकराम खर्डे या अविवाहित तरुणावर बंदुकीने फायरिंग केल्याचे बोलले जात आहे. यात अविनाश खर्डे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तात्काळ खाजगी गाडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये असलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेत सुकराम खर्डे आणि अविनाश खर्डे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…