कल्याण-डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल गाड्या स्थानकात उभ्या आहेत तर काही गाड्या या स्थानकांदरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन प्रवास करत आहेत. याचदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे नाल्यावरुन जात असताना चार महिन्यांचं बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते. यादरम्यान, अचानक त्या काकांच्या हातून चार महिनाचं बाळ निसटलं आणि ते नाल्याच्या पाण्यात जाऊन पडलं. नाल्याच्या तीव्र प्रवाहात ते बाळ वाहून गेलं. ही दुर्दैवी घटना २ वाजून ५५ मिनिटांनी घडली.
काही तरुणांनी नाल्याच्या दुसऱ्याबाजूने जाऊन ते बाळ कुठे सापडतं का याचा शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आलं नाही. दुसरीकडे, त्या बाळाची आई जीवाच्या आकांताने आपल्या बाळासाठी आक्रोश करत होती. ते पाहून साऱ्यांचेच डोळे भरुन आले. सध्या रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले असून बाळाचा शोध सुरु आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…