केंद्र सरकार विजेच्या दरात बदल करण्यासाठी नवे नियम तयार करणार आहे. येत्या काही दिवसांत विजेचे दर बदलतील. दिवसा विजेच्या दरात २० टक्क्यांची कपात करण्यात येईल. तर रात्री विजेचे दर २० टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती वीज मंत्रालयानं दिली आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास ठराविक तासांमध्ये विजेचा वापर अधिक होतो. या वेळेत होणारी कामं दिवसभरात केल्यास विजबिलात २० टक्के बचत करता येईल. वीज मंत्रालय नवे नियम आणण्याच्या तयारीत आहे. नव्या नियमांनुसार, दिवसा वीज २० टक्क्यांनी स्वस्त मिळेल. तर विजेचा सर्वाधिक वापर होत असलेल्या कालावधीत (पीक अवर्स) विजेचा दर २० टक्के अधिक असेल.
विजेच्या नियमांमध्ये बदल केल्यानंतर सध्या सर्वाधिक वीज वापर होत असलेल्या तासांमध्ये ग्रीडवर कमी दबाव पडेल, अशी अपेक्षा आहे. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत विजेचा सर्वाधिक वापर होतो. सकाळी वॉशिंग मशीन, पाण्याची मोटर यासाठी वीज वापरली जाते. तर संध्याकाळी लोक कामावरुन परतल्यानंतर टीव्ही, एसीचा वापर करतात. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर अधिक असतो.
एप्रिल २०२४ पासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी नवे नियम लागू होतील. त्यानंतर एका वर्षानंतर कृषी क्षेत्राला सोडून बहुतांश ग्राहकांसाठी नियम लागू होतील.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…