लातूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाला नियोजित कट करून घरी बोलावून त्याच्या डोळ्यात, अंगावर मिरची पावडर टाकून अमानूष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. औसा तालुक्यातील भादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. बळीराम नेताजी मगर (वय २५) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
३ जून रोजी भादा येथील आनंदनगर चौकात थांबलेल्या बळीरामला गावातीलच निखिल व्यंकट फरताळे याने “तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे”, असं सांगून आपल्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यावर निखिलच्या मामासह आई, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईकांनी संगणमत करून बळीरामला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
बळीरामच्या डोळ्यात, नाका-तोंडात तसेच अंगावर मिरची पावडर टाकली. या अमानुष बेदम मारहाणीने बळीराम बेशुद्ध होऊन पडला. ही घटना माहित होताच बळीरामच्या नातेवाईकांनी त्याला बेशुद्धावस्थेत लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १५ दिवस मरणाशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर थांबली अन् त्याचा उपचारादरम्यान काल शनिवारी मृत्यू झाला.
दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर मारहाणीचा व्हिडिओ सात दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. भादा पोलिसांनी बळीरामच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तक्रार दाखल करून घेत एका महिलेसह सात जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे करत आहेत.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…