लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाची आठवण झाली
मनतू पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचकिला गावातील रहिवासी सनोज कुमार सिंग याचा विवाह 10 मे रोजी प्रियंका कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर प्रियंका खुश नसल्याचं सनोजला जाणवू लागलं. आपल्याच गावात राहणाऱ्या जितेंद्र नामक तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, असं समोजला समजलं.
सध्या आसपासच्या घटना पाहता, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागल्यास, पती स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करुन घेत असल्याचे पाहायला मिळते, किंवा पत्नी अथवा तिच्या प्रियकराचे प्राण घेत असल्याची उदाहरणं वाचायला मिळतात. मात्र सनोजने कुणाच्याही जीवाशी किंवा आयुष्याशी खेळ न करण्याचा निर्णय घेतला.प्रियंका आणि जितेंद्र गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वेगळ्या जातीचा असल्याच्या कारणावरुन दोघांच्या लग्नाना कुटुंबीयांनी विरोध केला होता.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…