राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. महिला आपल्या पतीबरोबर जात असताना दोन तरुणांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. ‘तू तुझ्या पतीसोबत दर्शनाला जाऊ नको, माझ्यासोबत दर्शनाला चल’, असं म्हणत पतीसोबत दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्णपुरा मैदान या ठिकाणी घडली. दरम्यान, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यामध्ये दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश काशीराम चिपोल, विक्की बरेलीकर दोघेही(रा. रोहिदास पुरा जुना मोंढा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये राहते. दरम्यान, ही महिला कर्णपुरा येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी पती सोबत जात होती. यावेळी दोन तरुणांनी या पत्नी पत्नीचा पाठलाग केला. एवढ्यावरच न थांबता कर्णपुरा मंदिराच्या मैदानासमोरच त्यांनी पीडित महिलेला थांबवत ‘तू तुझ्या पतीसोबत दर्शनासाठी जाऊ नको माझ्यासोबत दर्शनाला चल’ असे म्हटले.
ही बाब ऐकून पती व महिलेला धक्का बसला. दरम्यान त्यांनी दोन्ही तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच विक्की बरेलीकर याने पीडितेच्या पतीला मारहाण केल्याचा देखील उल्लेख महिलेने दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या अनपेक्षित प्रकरणाने पती व महिला प्रचंड घाबरले होते.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…