ताज्याघडामोडी

२ हजार रुपयांच्या नोटा जमा करताना काय काळजी घ्याल? SBI ने सोप्या शब्दांत सांगितल्या नियम-अटी

दोन हजारांच्या नोटा बदलण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी नव्या नोटाबंदीच्या काळात अधिक सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. या नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणताही अर्ज, ओळखपत्र किंवा अधिग्रहण पत्राची (रिक्विजिशन स्लिप) गरज भासणार नाही.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दोन हजारांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांसमोर यापूर्वीच्या नोटाबंदीच्या काळातील अव्यवस्थेचे चित्र उभे राहिले. मात्र, त्या काळातील काही भयावह नियमांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न यंदा रिझर्व्ह बँकेने केला आहे. दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी तसेच बँकेतून त्या बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देतानाच त्यासाठीचे नियमही सुलभ करण्यात आले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी देशातील आपल्या सर्व मुख्य कार्यालयांना पत्रक पाठवून याविषयी अधिक स्पष्टता आणली. यानुसार २० हजार रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा बदलताना बँकेमध्ये कोणतेही ओळखपत्र, अर्ज किंवा अधिग्रहण पत्राची मागणी करण्यात येणार नाही. आपल्याच खात्यात कमाल किती मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा जमा करायच्या याबाबत रिझर्व्ह बँकेने कोणतेही बंधन घातलेले नाही. मात्र त्यासाठी खातेदाराला ‘केवायसी’ व अन्य विहित नियमांची पूर्तता करावी लागणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. एका वेळेला प्रत्येकाला २० हजार रुपयांच्याच नोटा बदलण्याचे बंधन असले तरी, एकदा नोटा बदलून झाल्यानंतर प्रत्येक वेळी नव्याने रांगेत उभे राहून पुन्हा २० हजार रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या नोटा बदलता येतील, असेही स्टेट बँकेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago