चार महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नीच्या नात्याचा भयंकर शेवट झाल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. संसार फुलायला सुरुवातही झाली नाही. मात्र, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने क्रूरतेची सगळी मर्यादा पार करत स्वतःच्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ठ श्रीनगर येथील महानंद मधुसूदन सरकार याने त्याची पत्नी खुशी महानंद सरकार वय (१८ वर्ष) ही २९ एप्रिल रोजी परस्पर घरातून निघून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन, मुलचेरा येथे दिली होती. त्यानंतर पोलीस शोधमोहीम राबवत असतानाच पती महानंदा सरकार याने १ मे रोजी पोलीस स्टेशन गाठून आपल्या शेतात राहत असलेल्या घराच्या बाजूला विहिरीत पत्नीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना सदर घटनेची माहिती देऊन पोलीस पथकासह तहसीलदार यांचे सक्षम पंचनामा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदनानंतर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणेदार अशोक भापकर यांनी चार जणांची तयार केली. घटनास्थळावरील परिस्थिती, दुवे व साक्षीदार यांच्या तपासात खुशी महानंद सरकार हिचा पती महानंद यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पतीला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…