गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीटही झाली असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाचा मारा थांबावा, यासाठी बळीराजाची प्रार्थना सुरू आहे. अशातच कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या दोन विभागांत पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, पुणे येथील निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या, तर विदर्भातील ११ जिल्ह्यांत उद्यापासून ३ दिवस अवकाळी वातावरणापासून सुटका मिळू शकते. त्यानंतरच्या २ ते ३ दिवसात म्हणजे शनिवार १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरण जाणवेल.
कोकण आणि विदर्भात वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी इतर भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्यात शनिवार १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. मात्र गारपीट होण्याचा धोका कमी आहे, अशीही माहिती माणिकराव खुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, १६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका सहन करत असलेल्या बळीराजाला साधारण आठवडाभरानंतर पूर्णत: दिलासा मिळू शकतो.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…