अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेणाची घाण धुण्यासाठी गेला असताना पाय घसरल्यामुळे तो कालव्यात पडला. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जहीर बेग रफीक बेग असे ३० वर्षीय युवकाचे नाव आहे. कुऱ्हा येथील बस स्थानक परिसरात त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे.
जहीर बेग आणि त्याचे दोन सहकारी जनावरांना चारण्यासाठी बावळी शेत शिवारात गेले होते. चराईनंतर जहीर घरी परत येत होता. त्यावेळी शेणाची घाण त्याच्या पायाला लागली. त्यामुळे जहीर पाय धुण्याकरिता कालव्यावर गेला. कालव्याच्या काठाशी पाय धुवत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो कालव्यातील पाण्यात पडला. ही घटना पाहून त्याच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरु केली.
फोनवरून एकाने गावातील नागरिकांशी संपर्क साधत जहीर कालव्यातील पाण्यात पडल्याची माहिती दिली. त्यामुळे परिसरात गावकऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. त्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली, परंतु कोणाच्याही प्रयत्नांना यश आले नाही.
पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने कालव्याच्या पाण्यात जहीरचा शोध सुरू करण्यात आला. परंतु, दुर्दैवाने किमान दोन किमी अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. कुऱ्हा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…