जालना शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून स्वतःला तलावात झोकून देत काल शनिवारी दुपारच्या सुमारास एका ४५ वर्षीय विवाहित शिक्षिकेने आत्महत्या केली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. जयश्री गणेश पोलास असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असल्याचे समजते. त्यांचे पती गणेश पोलास हे नायब तहसीलदार असून त्यांना २ मुलेही आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवार असल्याने दुपारी मोतीबाग परिसरातील चौपाटीवर नागरिकांची चांगलीच गर्दी होती. तलावाच्या भिंतींवर बरेच नागरिक बसलेले होते. अशातच जयश्री पोलास यादेखील चौपाटीवर पोहोचल्या. त्यांनी चौपाटीवरील भिंतीवरून स्वतःला तलावात झोकून दिले. त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी मोठी आरडाओरड सुरू केली.
एका महिलेने तलावात उडी मारल्याचे लक्षात येताच कुणीतरी चंदनझिरा पोलिसांना फोन केला. ही घटना कळताच चंदनझिरा पोलिसांनी मोती तलावाकडे धाव घेतली व मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.
जयश्री पोलास या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका तर त्यांचे पती गणेश पोलास हे महसूल खात्यात नायब तहसीलदार आहेत. सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबातील या महिलेने टोकाचा निर्णय का, घेतला यावरून शहरात दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे पोलीस तपासात याबाबत नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…