देशात थंडीचा लाट आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान शून्याच्याखाली गेले आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
संपूर्ण उत्तर भारतात ढगाळ वातावरण असणार आहे आणि पुढील आठवड्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावरही पावसाचे सावट आहे. तसेच लोकांना गोठवणाऱ्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. हवामान खात्याचे म्हणणे आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे उंच डोंगराळ भागातून मैदानी भागाकडे वाहणारे बर्फाचे वारे थांबले आहेत, त्यामुळे या भागात हवामानाच्या तापमानातही किंचित वाढ झाली आहे.
हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात थंडीचा कालावधी कमी आहे. पण तरी देखील मुंबई, कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि अहमनगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणारे आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…