ताज्याघडामोडी

विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट

गेल्या काही दिवसांमध्ये झारखंडमधील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्यानं खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

मकर संक्रातींच्या रात्री राजगड जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रियकरानं आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हजारीबागमधील रामगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. अरमान खान उर्फ रॉकी बाबा नावाच्या व्यक्तीनं 14 जानेवारी रोजी विवाहित प्रेयसी ममताचा जीव घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार ममता विवाहित होती आणि तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. ममता विवाहित असूनही तिचं आणि अरमानचं अफेअर सुरू होतं, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. आरोपी तिला आपल्यासोबत येण्यासाठी दबाव टाकत होता.

घटनेच्या दिवशीही तो तिला घेण्यासाठी आला होता. मात्र, ममतानं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानं तो तिच्याशी भांडू लागला. त्याने तिला बेदम मारहाण केली. या भीषण घटनेबाबत मृत ममताची बहीण जया हिने आरोपी अरमानविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

13 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago