ताज्याघडामोडी

पेनाने लिहिलेल्या २००, ५०० आणि २०००च्या नोटा अमान्य होणार? RBI ने दिलं उत्तर

सध्या सोशल मीडियावर २००, ५०० आणि २००० आणि इतर नोटांबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. या नोटांवर काही लिहिलं असल्यास त्या चलनातून बाद होतील असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. आता हा मेसेज खोटा असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेकर पीआयबीने सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. खोट्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की आरबीआयच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, नव्या नोटांवर काहीही लिहिलं असल्यास त्या नोटा चलनातून बाद होतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर काहीही लिहू नये असं आवाहन केलं आहे. नोटांवर लिहिल्याने त्या खराब होतात आणि त्यांचा कालावधी कमी होतो. पण त्या चलनातून बाद केल्या जात नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असं म्हटलंय, की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, नव्या नोटांवर काहीही लिहिल्यास त्या नोटा अमान्य होतील आणि त्या कायदेशीर राहणार नाहीत.

मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत माहिती देत, पेनाने लिहिलेल्या चलनी नोटा अमान्य ठरणार नाहीत. तसंच त्या कायदेशीर राहतील असं म्हटलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago