बदनामी असह्य झाल्याने घेतला निर्णय
रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कालिदास स्मारक ते अंबाळा मार्गावरील झाडाला दोरी बांधून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रंजना (बदललेले नाव ) ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी रंजना व मयूरचे(बदललेले नाव ) प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर रंजना मुलांना सोडून मयूरसोबत रामटेक येथे गेली. तेथे दोघेही भाड्याने राहायला लागले. दरम्यान, रंजनाच्या पतीने ती बेपत्ता असल्याची तक्रार हिंगणा पोलिसांत दिली. पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची नोंद केली. नातेवाइकांनी शोध घेतल्यानंतर ती रामटेक येथे मयुर याच्यासोबत राहत असल्याचे त्यांना आढळले. तेथे जात त्यांनी रंजनला परत आणले. मात्र, तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला.
त्यानंतर ती पुन्हा निघून गेली आणि मयूरसोबत राहायला लागली. रंजना आणि मयुर यांच्या दरम्यान सुरू असलेला हा प्रकार गावकऱ्यांना समजला. काही दिवसातच लोक त्यांच्या विषयी चर्चा करू लागले. त्यांची गावात बदनामी झाली. हे रंजना आणि मयुर यांना समजले. बदनामीमुळे दिवसेंदिवस त्यांना राहणे असह्य होऊ लागले. त्यामुळे दोघांनी अगदी टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविण्याचे ठरविले.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…