दोन मित्र हॉटेलमध्ये भजी खात असताना किरकोळ करणावरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच धारदार चाकूने मित्रावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान मित्राचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद – पैठण मार्गांवरील साखर कारखाना परिसरात घडली आहे.
अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख (वय-३५ रा. पिराची पिंपळवाडी, पैठण) असे मृताचे नाव आहे. तर रामेर उर्फ राम गजेसिंग बोते (वय-३७ रा.साखर कारखाना कॉलनी पैठण) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी अब्दुल आणि राम अडीच वाजेच्या सुमारास कारखाना परिसरातील एका हॉटेलमध्ये भजी खाण्यासाठी गेले होते. तेथे गप्पा मारत दोघेही भजी खात होते. दरम्यान किरकोळ विषयाला घेऊन दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर बाचाबाची झाली.
वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या रामने बाजूच्या अंडा ऑम्लेटच्या दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकूने अब्दुलवर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर अब्दुल जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अब्दुलली तसंच टाकून आरोपी रामने तेथून पळ काढला. तेथे उपस्थितांनी जखमी अब्दुलला तातडीने रुग्णाल्यात हलवले. मात्र, उपचार सुरु असताना अब्दुलचा मृत्यू झाला.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…