राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफिया तसेच वाळू माफियांशी साटेलोटे करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाचं दम दिला आहे. वाळू (रेती) उत्खनन करून पर्यावरण धोक्यात आणणारे राज्य सरकारचा महसूल बुडावणाऱ्या विरुद्ध राज्य सरकारकडून कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज तीन दिवसीय ‘मिनकॉन’ परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात आलेले नवीन सरकार हे पैसे खाणारे आणि धंदा करणारे नाही लक्षात ठेवा. रेतीचा व्यवहार मंत्री आणि जनप्रतिनिधी काळाबाजार करत होते ते आता चालणार नाही. एकही पैसा आम्हाला नको. मात्र एक एक पैसा हा जनतेचा तो सरकारी तिजोरीत जाईल असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. जे काळाबाजारी आणि भ्रष्ट्राचार करतील त्यांना मी जेलमध्ये टाकील. आमच्या पर्यावरणाला धोक्यात आणून केलेले व्यवहार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. आधी काय केलं हे मला माहीत नाही; पण पुढे हे मी सहन करणार नाही, अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारी आणि वाळू माफी यांची कानउघाडणी केली आहे.
सरकारच्या उपक्रमाचे पालन होत नसेल तर अधिकाऱ्यांना घरी बसवायला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकार बदलले हे लक्षात आले पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…