ताज्याघडामोडी

भाच्याच्या प्रेमात वेड्या आत्याने केलं पळून लग्न, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी…

जिथे प्रेम असतं तिथे नाती, समाज, वय काहीच दिसत नाही, असं म्हणतात. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये समोर आला आहे. येथे भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या आत्याने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. घरच्यांच्या हे लक्षातही आलं नाही. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता या जोडप्याने राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

भरतपूर येथील रहिवासी असलेली २९ वर्षीय तरुणी २१ सप्टेंबर रोजी घरातून पळून गेली होती. तिने मथुरा येथे राहणाऱ्या तिच्याच वयाच्या भाच्या्यासोबत कोर्टमॅरेज केले. दोन दिवसांनंतर २३ सप्टेंबर रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

यादरम्यान दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्याबाबत माहित झालं. आता मुलीने ट्वीट केलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस आमदार सचिन पायलट यांच्यासह स्थानिक पोलीस-प्रशासनाला टॅग करत तिने माहेर आणि सासरच्या बाजूने सुरक्षेची मागणी केली. “दोन्ही कुटुंबं मिळून त्यांना त्रास देत आहेत. मानसिक ताण देत आहेत. माझा जीव धोक्यात आहे. मी माझ्या स्वेच्छेने लग्न केले आहे, उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही हे लग्न वैध ठरवले आहे. देवा मला मदत कर.”

भरतपूर पोलिसांनीही तरुणीच्या मदत मागणाऱ्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी लिहिले की, “याप्रकरणी संबंधित स्टेशन प्रभारींना निर्देश दिले आहेत, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या आणि निवेदन द्या, तुम्हाला सुरक्षा दिली जाईल.”

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago