ताज्याघडामोडी

शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची भव्य तयारी सुरू; अनेकांचे प्रवेश होणार

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात आता आपल्याकडे येण्यास अनेक जण उत्सुक असून, दसरा मेळाव्यात या सर्वांचे प्रवेश होतील,’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दसरा मेळाव्याची उत्सुकता अधिकच ताणली. त्याचवेळी, ‘मी फार काही बोलत नसताना, तुम्ही विनाकारण कशाला बोलता,’ असे सांगत पक्षातील वाचाळवीर मंत्र्यांना, तसेच आमदारांनाही त्यांनी समज दिली.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली असून, याचाच भाग म्हणून दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीबाबत बुधवारी शिंदे गटाची बैठक वानखेडे स्टेडियमजवळील गरवारे क्लबमध्ये झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे, त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. यात सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘कालचा निकाल आपला उत्साह वाढवणारा आहे.

या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आता आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘त्यांच्या’ दसरा मेळाव्यापेक्षा जास्त ताकद आपल्या मेळाव्यात दिसली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून २५ हजारांहून अधिक शिवसैनिक मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यासाठी ३५० बसेसचे नियोजन झाले आहे. मतदारसंघातून ५०० बसेसची मागणी होत असल्याचे सत्तार यांनी सांगितले. शिवसेना नेते रामदास कदम यांनीही बैठकीनंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले. ‘हा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुखांच्या परंपरेला साजेसा होईल.

सबंध देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं आहे. गर्दीचं नियोजन केलं जाईल, शक्तिप्रदर्शनाची आवश्यकता नाही. शिवेसना कुणाची हा निर्णय न्यायालयात लागण्याआधीच दसऱ्याला लागेल. ताकद असती तर ५० आमदार आणि खासदार सोडून गेले नसते. आता भाड्याने राष्ट्रवादीतून आलेल्यांना नेते-उपनेते करून आमच्या अंगावर सोडलं जात आहे,’ असा टोला कदम यांनी लगावला.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. ‘जाधव यांचे डोके सडलेले असून, तो बाडगा शिवसेना सोडून शरद पवारांकडे गेला आणि परत आला. बाडगे जास्त कडवट असतात,’ असेही ते म्हणाले. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी पक्षप्रमुख नेतेपद रिक्त ठेवले असल्याचे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago