ताज्याघडामोडी

मोबाईल लॉक काढून देण्यास पतीचा नकार

साखर कारखाना कामगाराच्या पत्नीची आत्महत्या

 

पती पत्नीचं नातं हे कुठल्याही अपेक्षा विरहित असतं,सुख सुखात संकटात साथ देणार असतं असं मानलं जाते.मात्र वैवाहिक आयुष्यात काही घटना अशा घडतात कि त्यामुळे या पवित्र नात्याची वीण किती कमकुवत होऊ शकते हे पाहवयास मिळते.अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात घडली आहे. या तालुक्यातील शिरटे येथील साखर कारखाना कामगार व शेतकरी असलेल्या भगवान खोत  यांच्या पत्नीने पतीने  मोबाईलचे लॉक उघडून दिले नाही त्यामुळे निराश होत  घराच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना   घडली आहे. मनीषा भगवान खोत असे मृत महिलेचे नाव आहे.         
   शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी निवृती खोत यांनी फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाइल पत्नीने घेतला. त्याचा लॉक काढून द्या असा हट्ट पत्नी भगवान यांच्याकडे करू लागली. परंतु भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाइल लॉक काढून दिला नाही त्यामुळे पत्नी निराश झाली आणि चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन पत्नीने साडीच्या साह्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago