महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. तर, भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. याप्रकरणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“भाजपने एकट्याने ७७ हजार मतं मिळवली” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच “ही लढत तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष होती’ असंही ते म्हणाले. हिंदुत्व हा आमचा मुद्दा नाही तर श्वास आहे असं म्हणत पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम रिंगणात होते. दोन्ही पक्षांमध्ये विजयासाठीची चुरस पाहायला मिळाली. तर या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात ठाण मांडला होता. तर कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोमात प्रचार केला होता.
मात्र, अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित पाटील यांना पराभूत केले आहे. विशेष म्हणजे, कोल्हापुरातुन पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी पटकावला आहे.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…